Home » पाकिस्तानला बसणार पाण्याचा मोठा फटका! सिंधू करारानंतर भारताचा आणखी कठोर निर्णय; बगलिहार धरणातून थांबवले चिनाबचे पाणी

पाकिस्तानला बसणार पाण्याचा मोठा फटका! सिंधू करारानंतर भारताचा आणखी कठोर निर्णय; बगलिहार धरणातून थांबवले चिनाबचे पाणी

भारताने सिंधू जल करार रद्द केल्यानंतर आता पाकिस्तानवर आणखी एक मोठा पाणलोट धोका निर्माण केला आहे. भारत सरकारने चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाण्याचा प्रवाह थांबवला आहे. त्यामुळे सिंधू प्रणालीतील पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे. याचबरोबर झेलम नदीची उपनदी नीलमवर असलेल्या किशनगंगा प्रकल्पालाही बंद करण्याची तयारी भारत करत आहे.

भारताची पाण्यावर नियंत्रण धोरण:
चिनाब नदीवर असलेल्या बगलिहार धरणातून पाणी थांबवले गेले असून झेलम नदीवरील किशनगंगा धरणालाही लवकरच बंद करण्याचा विचार सुरू आहे. भारताने सिंधू करार रद्द केल्यानंतर पाण्याच्या नियंत्रणासाठी हे पहिले ठोस पाऊल उचलले आहे.

पाकिस्तानवरील संभाव्य परिणाम:
बगलिहार आणि किशनगंगा या दोन महत्वाच्या धरणांमधून पाण्याचा प्रवाह रोखल्यास पाकिस्तानमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवू शकते. तसेच भविष्यात भारत या धरणांचे दरवाजे उघडल्यास अचानक पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सिंधू कराराचे पुनरावलोकन:
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानबरोबरचा सिंधू जल करार तत्काळ रद्द केला. या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचे प्राण गेले होते.

सिंधू जल करार काय होता?
1960 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात जागतिक बँकेच्या मध्यस्थीने सिंधू जल करार झाला होता. या करारानुसार सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी पाकिस्तानला तर रावी, बियास आणि सतलज नद्यांचे पाणी भारताला वापरण्यास मान्य होते. मात्र 23 एप्रिल 2025 पासून हा करार रद्द करण्यात आला आहे.

भारताचा पुढील निर्णय काय असू शकतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे