
‘‘आपला देश धर्मशाळा नाहीये…’ शरणार्थ्यांच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचं कठोर वक्तव्य; नेमकं काय आहे प्रकरण?
शरणार्थ्यांच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. श्रीलंकेच्या एका नागरिकाच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं की भारत हा असा देश नाही की जिथे जगभरातील सर्व शरणार्थ्यांना आसरा दिला जावा. संविधानातील अनुच्छेद १९ आणि २१ हे फक्त भारतीय नागरिकांसाठी लागू होतात, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. शरणार्थ्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचं तिखट मत श्रीलंकेच्या नागरिकाच्या…