Home » “पुढील सुट्टी काश्मीरमध्येच घेणार…” पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सुनील शेट्टी संतापले, दिला मोठा संदेश.

“पुढील सुट्टी काश्मीरमध्येच घेणार…” पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सुनील शेट्टी संतापले, दिला मोठा संदेश.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. बॉलिवूडमधील कलाकारही पुढे येऊन आपला रोष व्यक्त करत आहेत आणि चाहत्यांना एकतेचे आवाहन करत आहेत. नुकतेच अभिनेता सुनील शेट्टी यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना या हल्ल्यावर कठोर वक्तव्य केले.

पहलगाम हल्ल्यावर सुनील शेट्टी यांची प्रतिक्रिया
सुनील शेट्टी लवकरच ‘केसरी वीर’ चित्रपटात दिसणार
सुनीलकडे तीन नव्या चित्रपटांची तयारी सुरू

काश्मीरच्या पहलगाम परिसराला ‘मिनी स्वित्झर्लंड’ असे म्हटले जाते. नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांनी आपले प्राण गमावले. विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केल्याची माहिती आहे, ज्यामुळे देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या हल्ल्याचा निषेध करताना पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली आहे आणि दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांनी एकतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
सुनील शेट्टी यांनीही चाहत्यांना धैर्य न सोडण्याचा सल्ला दिला आहे.

काश्मीरमध्येच सुट्टी घालवणार – सुनील शेट्टी यांचे ठाम मत