Home » HSC निकाल 2025 : राज्याचा एकूण निकाल 91.88%, बारावीचा निकाल घोषित

HSC निकाल 2025 : राज्याचा एकूण निकाल 91.88%, बारावीचा निकाल घोषित

महाराष्ट्र बोर्डाने आज बारावीचा निकाल जाहीर केला असून राज्याचा यंदाचा निकाल 91.88% इतका लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल mahresult.nic.in, results.digilocker.gov.in, mahahsscboard.in आणि https://hscresult.mkcl.org/ या संकेतस्थळांवर पाहता येईल.

निकाल 2025 : वडिलांची आठवण, वैभवी देशमुखने भावुक शब्दांत मांडली भावना

बीड – “माझ्या मेहनतीचे चीज झाले, पण वडिलांच्या शुभेच्छांची उणीव आहे.” 85.33% गुण मिळवलेल्या वैभवी देशमुखने आपले मनोगत मांडले. तिच्या वडिलांचा निर्घृण खून झाला होता. त्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी तिची मागणी आहे. वैभवीने सांगितले की, नीट परीक्षाही दिली असून त्यात काही अडचणी आल्या असल्या तरी ती वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार.

धाराशिव जिल्ह्याचा घवघवीत यश: लातूर विभागात प्रथम स्थान

लातूर विभागाचा एकूण निकाल 89.46% असताना धाराशिव जिल्ह्याने 92.32% निकालासह आघाडी घेतली आहे. नांदेड 90.82% निकालासह दुसऱ्या तर लातूर 86.68% गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर.

वैभवी देशमुखने दाखवले धैर्य; वडिलांच्या हत्येनंतरही मिळवले यश

मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. अशा कठीण प्रसंगी वैभवीने बारावीत 600 पैकी 512 गुण मिळवले. तिचे विषयनिहाय गुण पुढीलप्रमाणे –
इंग्रजी: 63
मराठी: 83
गणित: 94
भौतिकशास्त्र: 83
रसायनशास्त्र: 91
जीवशास्त्र: 98

निकाल पाहण्याची प्रक्रिया : विद्यार्थ्यांनी असे करा तपासणी

1. mahresult.nic.in या वेबसाइटवर लॉगिन करा.

2. ‘HSC Result’ लिंकवर क्लिक करा.

3. आपला सीट नंबर आणि आवश्यक माहिती भरून ‘सबमिट’ करा.

4. निकाल स्क्रीनवर पाहता येईल. त्याची प्रिंट घ्या.

नाशिक विभागाचा निकाल 91.31%, राज्यात सातवा क्रमांक

नाशिक विभागातून 1.58 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1.44 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विभागाचा निकाल 91.31% लागला आहे.

विशेष बाब: दिव्यांग विद्यार्थ्यांची 92.38% उत्तीर्णता

राज्यात 7,310 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6,705 विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.

निकालाच्या टक्केवारीत घट : मागील वर्षीपेक्षा यंदा 1.49% नी कमी

2024 मध्ये 93.37% होता निकालाचा टक्का. 2025 मध्ये तो 91.88% इतका झाला आहे.

2027-28 पासून बारावीचा नवीन अभ्यासक्रम लागू होणार

शिक्षण मंडळाने जाहीर केले की 2027-28 या शैक्षणिक वर्षापासून इ.१२ वी साठी नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे.

कॉपी प्रकरणांवर कारवाई : 124 केंद्रांची चौकशी

राज्यातील 3,373 केंद्रांपैकी 124 केंद्रांवर गैरप्रकार आढळले. संबंधित केंद्रांची चौकशी होणार असून दोषी ठरल्यास केंद्रे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय.

विभागनिहाय यश: कोकण अव्वल, लातूर शेवटचा

कोकण – 96.74%

कोल्हापूर – 93.64%

मुंबई – 92.93%

संभाजीनगर – 92.24%

अमरावती – 91.43%

पुणे – 91.32%

नाशिक – 91.31%

नागपूर – 90.52%

लातूर – 89.46%

मुलींनी घेतली आघाडी : 94.58% उत्तीर्णता

मुलींचा निकाल 94.58%, मुलांचा 89.51% असा आहे. मुली मुलांपेक्षा 5.07% ने पुढे आहेत.