खंडाळा घाट ते खालापूर दरम्यान साधारणतः आठ ते दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत असून, काही मिनिटांत पार होणाऱ्या अंतरासाठी तासभराचा वेळ लागत आहे.
आजच्या सुट्टीमुळे सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांना बंद असल्याने, तसेच शाळांमध्ये उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्याने नागरिकांनी प्रवासाचा बेत आखलेला आहे.
या कारणामुळे महामार्गावर वाहनांची संख्या अचानक वाढली असून, रस्त्यात अडकलेल्या प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वाहनांच्या इतक्या लांबचलांब रांगा लागल्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल होत असून, वाहतूक नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे