आतापर्यंत लीगमध्ये एकूण 58 सामने खेळवले गेले आहेत.
बीसीसीआयकडून आलेल्या माहितीनुसार, आयपीएलला केवळ एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहे आणि परिस्थिती सामान्य झाल्यावर नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
आयपीएलच्या अधिकृत एक्स (X) अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने सर्व महत्त्वाच्या भागधारकांशी सल्लामसलत करून घेतला आहे. फ्रँचायझी संघांनी त्यांच्या खेळाडूंच्या भावना, तसेच प्रेक्षक, प्रायोजक आणि प्रसारकांचे विचार यावर भर दिला आहे. बीसीसीआयला आपले सशस्त्र दल मजबूत आणि सज्ज आहेत यावर पूर्ण विश्वास आहे, परंतु सर्वांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला.
बीसीसीआयने म्हटले आहे की, “या गंभीर क्षणी बोर्ड राष्ट्राच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आम्ही भारत सरकार, सशस्त्र दल आणि देशातील जनतेशी एकात्मता व्यक्त करतो. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत आपल्या वीर जवानांनी दाखवलेली शौर्य, धैर्य आणि निस्वार्थ सेवा याला आम्ही सलाम करतो. त्यांच्या प्रयत्नांमुळेच अलीकडील दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तानच्या लष्कराकडून झालेल्या अन्यायकारक आक्रमणाला योग्य प्रत्युत्तर दिले जात आहे.”
अधिक वाचा:
IPL 2025 स्थगित: 58 सामन्यांनंतर थांबला 18वा हंगाम, पाहा गुणतालिकेत कोण आहे अव्वल? ऑरेंज आणि पर्पल कॅप कोणाच्या शिरपेचात?