Home » तुर्की आणि अजरबैजान बहिष्कार: भारतातील पर्यटकांचा रोष उफाळला, तुर्की-इस्तांबूल !

तुर्की आणि अजरबैजान बहिष्कार: भारतातील पर्यटकांचा रोष उफाळला, तुर्की-इस्तांबूल !

दैनिक Maharashtra niropya सर्व भारतीयांना कळकळीचे आवाहन करते की, तुर्की, इस्तांबूल (अजरबैजान) या देशांना आता बॉयकॉट करण्याची वेळ आली आहे. ज्यांनी भारताच्या मदतीचे मीठ खाल्लं, ज्यांच्या भूकंपाच्या काळात भारताने सर्वात मोठी मदत केली, त्या देशांनी भारतावर झालेल्या हल्ल्यांनंतर पाकिस्तानला खुले समर्थन दिलं आहे. आज आपली भारतीय एकता दाखवण्याची हीच वेळ आहे.

तुर्की आणि अजरबैजानचा भारतविरोधी पवित्रा; भारतीय पर्यटकांनी सुरू केला बहिष्कार

नवी दिल्ली (आयएएनएस) — भारताविरोधात पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने भारतीय पर्यटकांनी तुर्की आणि अजरबैजान या देशांच्या पर्यटनाचा पूर्णपणे बहिष्कार केला आहे. ईज माय ट्रिप आणि कॉक्स अ‍ॅण्ड किंग्स यांसारख्या नामांकित ट्रॅव्हल कंपन्यांनी या दोन्ही देशांचे टूर पॅकेजेस संपूर्णपणे रद्द केले आहेत.

मालदीवनंतर तुर्कीही भारतीय संतापाचा बळी

मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि लक्षद्वीपविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भारतीय पर्यटकांनी मालदीवलाही नकार दिला होता. यामुळे त्यांच्या पर्यटनावर मोठा आघात बसला. तशीच परिस्थिती आता तुर्की आणि अजरबैजानचीही झाली आहे.

2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपचे फोटो शेअर करून भारतीयांना तिथे जाण्याचं आवाहन केलं होतं. त्यावेळी मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे भारतीय पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर मालदीव टाळलं होतं.

तुर्कीची विनवणी, पण भारतीयांची स्पष्ट ना

तुर्कीने इंटरनेटवर पोस्ट शेअर करत भारतीय पर्यटकांना पुन्हा येण्याचं आमंत्रण दिलं आहे. “आम्ही भारतीयांचा सदैव आदर केला आहे आणि भविष्यातही करू,” असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी हेही सांगितलं की, स्थानिक लोक भारत-पाक संघर्षाबद्दल अनभिज्ञ आहेत आणि याचा त्यांच्या पर्यटनावर परिणाम होत नाही.

परंतु या अपीलला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. ७ मेनंतर तुर्की आणि अजरबैजानसाठी कोणतीही नवीन बुकिंग आलेली नाही, असं ट्रॅव्हल एजन्सीजकडून सांगण्यात आलं आहे.

४००० कोटींची मदत करूनही भारतविरोधात भूमिका

उद्योगपती हर्ष गोयंका यांनी यासंदर्भात पोस्ट करत सांगितलं की, भारतीय पर्यटकांनी तुर्की आणि अजरबैजानमध्ये गेल्या वर्षभरात ४००० कोटी रुपयांहून अधिक खर्च केला, ज्यामुळे तिथे रोजगारनिर्मिती झाली आणि अर्थव्यवस्था बळकट झाली. तरीही हे देश भारताविरोधात बोलत आहेत.

आता वेळ आली आहे – “बॉयकॉट तुर्की, इस्तांबूल, बेजान”

भारतीयांच्या मदतीचा गैरवापर करणाऱ्या आणि पाकिस्तानसारख्या दहशतवादी देशाला समर्थन देणाऱ्या तुर्की, अजरबैजान आणि इस्तांबूलसारख्या ठिकाणांना आपण एकत्र येऊन विरोध केला पाहिजे. जगात फिरायला भरपूर चांगले देश आहेत – पण आपली इज्जत आणि देशभक्ती यांचं भान ठेवणंही गरजेचं आहे.

दैनिक महाराष्ट्र निरोपचा स्पष्ट संदेश –
बॉयकॉट तुर्की
बॉयकॉट इस्तांबूल
बॉयकॉट बेजान
जगात खूप सुंदर सुंदर अजून देश आहेत परंतु. तुर्की आता नाही ..
जय हिंद!