Home » राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : राष्ट्रनिर्माणाचे अद्वितीय कार्य.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : राष्ट्रनिर्माणाचे अद्वितीय कार्य.

आज आपण ज्या भारतभूमीवर उभे आहोत, ती फक्त एक भूमी नाही तर एक विचार आहे, एक संस्कृती आहे, आणि त्या संस्कृतीच्या रक्षणासाठी, जपणुकीसाठी आणि विस्तारासाठी कार्य करणारी संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – RSS.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर १९२५ रोजी, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे केली. त्यांना जाणवले की भारताला केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हे, तर सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची नितांत आवश्यकता आहे. ही भावना घेऊन त्यांनी RSS ची पायाभरणी केली.

RSS चे कार्य ‘राष्ट्र प्रथम’ या तत्वावर आधारित आहे. संघाचे प्रत्येक स्वयंसेवक आपले जीवन राष्ट्रासाठी अर्पण करण्याची भावना बाळगतो. संघामध्ये कोणतेही पद, पैसा किंवा प्रसिद्धी यांचा विचार नसतो. येथे केवळ निःस्वार्थ देशसेवा आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद असतो.

आज देशभरात लाखो स्वयंसेवक संघटितपणे देशाच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. ते समाजसेवा, आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संरक्षण आणि अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात. मी स्वतः शाखा आणि संघशिबिरामध्ये नियमित सहभागी होतो, आणि तिथे मिळणारे संस्कार, शिस्त, वाचन आणि राष्ट्रभक्तीचा अनुभव हा आयुष्याला दिशा देणारा असतो.

RSS च्या संस्कृतीमध्ये ‘हिंदू’ हा केवळ एक धर्म नसून तो जीवनशैली मानला जातो. ही जीवनशैली सर्वांना सामावून घेणारी आहे – ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारित. संघ हिंदू संस्कृतीचे पालन करतो आणि तिच्या माध्यमातून राष्ट्राला एकसंध करण्याचे काम करतो.

RSS मधून अनेक महान व्यक्तिमत्त्वांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे –

श्री अटलबिहारी वाजपेयी, भारताचे माजी पंतप्रधान

एल के आडवाणी यांच्याशीही संघाचा स्नेहसंबंध होता

आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा संघातून आलेले आहेत

मोहन भागवत, सरसंघचालक, यांचे नेतृत्व आजच्या पिढीला प्रेरणा देणारे आहे

RSS चे महत्व आज अधिकच वाढले आहे कारण भारताला आज गरज आहे –

एकतेची

राष्ट्रप्रेमाची

नैतिकतेची

आणि अशा कार्यकर्त्यांची जे आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित करतील

म्हणून मी आवाहन करतो की, जास्तीत जास्त युवक-युवती, विद्यार्थी, शिक्षक, व्यापारी, शेतकरी, कामगार – सर्वांनी RSS मध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. आपल्या देशाला बलशाली, सशक्त, आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी RSS ही अत्यंत आवश्यक संस्था आहे.

“एकच लक्ष्य – भारत माता की जय”
“एकच मंत्र – संघशक्ती, राष्ट्रशक्ती”

जय हिंद!
(लेखक: सुमित एस. कुलकर्णी)
(नियमित शाखा व संघशिबिरांचा सहभागी)

Rashtra Pratham