पुढे निवेदनात म्हटले आहे की, मौजे पिंपळगाव माळवी येथील माजी उपसरपंच कै. लताबाई नानाभाऊ कराळे यांची दि. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी निर्गुण पणे हत्या करण्यात आलेली आहे. सदर हत्येला तीन महिने उलटून देखील अजूनही कुठल्याही प्रकारचा तपास लागलेला नाही. अंत्यविधीच्या वेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी आश्वासन दिले होते दोन दिवसात तपास लाऊ मात्र तीन महिने होऊन देखील कुठल्याही प्रकारचे आरोपी सापडले नाही. त्यामुळे मौजे पिंपळगाव माळवी येथील महिला व ग्रामस्थ भयभीत झालेले आहे. तसेच गावांमध्ये पोलीस प्रशासना विरोधात ग्रामस्थांचा असतोष निर्माण झाला आहे. हा तपास पोलीस यंत्रणेंनी गहाळ केला की काय? अशी उलट सुलट चर्चा पिंपळगाव माळवी सह परिसरातील गावांमध्ये चालू आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी येत्या ८ दिवसाच्या आत तपास लावावा अन्यथा शिव प्रहार संघटना व मौजे पिंपळगाव माळवी ग्रामस्थ पीडित कुटुंबीयांसह मंगळवार दिनांक १३ मे २०२५ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले आहे.
