नवी दिल्ली – भारत जगातील एक महान राष्ट्र म्हणून उदयास आला आहे, तर पाकिस्तान आजही दहशतवादाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. भारत जिथे आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करतो, तिथे पाकिस्तान केवळ दहशतवाद पोसण्यात गुंतलेला आहे.
भारताने आजवर अनेक दहशतवादी हल्ले सहन केले – १९९६, २००१ मध्ये संसद भवनावरील हल्ला, २००८ चा मुंबई हल्ला आणि अशा अनेक वेळा निष्पाप भारतीय नागरिक व जवानांनी आपले प्राण गमावले. या हल्ल्यांमागे थेट पाकिस्तानातून संचलित दहशतवादी संघटना जबाबदार होत्या, हे जगजाहीर सत्य आहे.
आज जग भारताच्या पाठीशी उभे आहे कारण भारत शांततेचा, मानवतेचा आणि विकासाचा पुरस्कार करतो. भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे, जागतिक स्तरावर भारत एक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. दुसरीकडे पाकिस्तान दहशतवादी प्रवृत्ती आणि अराजकतेत अडकलेला आहे.
पाकिस्तानने कित्येक वर्षांपासून भारतविरोधी कारवाया केल्या असून, त्यांच्या भूमीतून भारतीय जवानांवर आणि नागरिकांवर अनेकदा घातक हल्ले घडवले गेले. आता भारताने मानवतेच्या विरोधात विचार करणाऱ्या मानसिकतेला पूर्णपणे संपवण्याची वेळ आली आहे.
भारतासाठी राष्ट्र प्रथम आहे – ‘जय हिंद’, ‘जय भारतीय सेना’ हे फक्त घोषवाक्य नसून भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयातले ब्रीद आहे.
भारत शांततेसाठी झगडतो, पण मानवतेच्या शत्रूंना पाठीशी घालणाऱ्यांविरुद्ध कठोर पाऊल उचलायलाही सदैव सिद्ध आहे.
वंदे मातरम! जय हिंद