Home » NATION

कोविड-19: देशात पुन्हा वाढतेय कोरोनाचं संकट; केरळात सर्वाधिक रुग्ण, महाराष्ट्रात 208 नवे केस

भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. देशात सध्या 1010 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केरळमध्ये सर्वाधिक 430, तर महाराष्ट्रात 208 नवे रुग्ण आढळले आहेत. काही राज्यांमध्ये मृत्यूही झाले आहेत. NB.1.8.1 आणि LF.7 हे नवे व्हेरिएंट सध्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) निरीक्षणाखाली आहेत. पुढे जाणून घ्या कोरोना संबंधीचा ताज्या घडामोडींचा आढावा. — कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ सध्या दिल्लीमध्ये…

Read More

“अमेरिकेने जे सोसले, तेच आता आपणही भोगतोय” – 9/11 स्मारकाजवळ शशी थरूर यांनी पाकिस्तानवर साधला निशाणा”

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारताने जगाला पाकिस्तानचा दहशतवादाशी संबंध दाखवण्यासाठी ७ प्रतिनिधीमंडळांची तयारी केली आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली एक प्रतिनिधीमंडळ अमेरिकेत पोहोचले असून, त्यांनी तेथे दहशतवादाच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी पहलगाम हल्ल्याचा हेतू हिंदू-मुस्लिम ऐक्य भंग करणे असल्याचे स्पष्ट करताना भारत कधीच दहशतवाद सहन करणार नसल्याचे ठामपणे सांगितले. — सर्वपक्षीय…

Read More

तुर्की-आजरबैजानऐवजी पर्यटक दक्षिण व ईशान्य भारतात वळत आहेत; बुकिंग रद्द करण्याची लाट कायम ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला खुले समर्थन दिल्याने पर्यटक झाले नाराज

मुंबई | प्रतिनिधी – पाकिस्तानमधील दहशतवादी गटांविरोधात भारताने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुर्की आणि अझरबैजान यांनी पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला. यानंतर भारतीय पर्यटक आणि टूर ऑपरेटरांनी या दोन देशांतील बुकिंग मोठ्या प्रमाणावर रद्द केली आहे. ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. त्यामुळे आता पर्यटकांचा कल दक्षिण आणि ईशान्य भारताकडे वळलेला दिसतो आहे. परंतु महागड्या विमानसेवा…

Read More

पाकिस्तानचे (पाकड्याचे )दुष्ट हेतू उधळून लावले – पंतप्रधान मोदी यांचे आदमपूरहून भाषण

ऑपरेशन सिंदूरनंतर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जालंधर येथील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. त्यांनी तेथून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, “गर्वाने सांगतो की आपण सर्वांनी आपले उद्दिष्ट पूर्णतेने साध्य केले आहे. पाकिस्तानचे दहशतवादी तळ आणि हवाई तळच नाही, तर त्यांचे दुष्ट हेतू आणि दुस्साहस देखील पराभूत झाले आहेत.” आदमपूर एअरबेसहून मोदींचे राष्ट्राला उद्दबोधन पंतप्रधान…

Read More

“ऑपरेशन सिंदूर”: पाकला दिला जोरदार प्रत्युत्तर – पंतप्रधान मोदींचा राष्ट्राला संदेश

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर राष्ट्राला संबोधित करत भारताच्या शौर्याची उजळणी केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जेव्हा आपल्या सैन्याने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला, तेव्हा पाकिस्तानने त्यांच्यावर संरक्षणात्मक कारवाई करत भारतावर प्रतिहल्ला केला. मात्र भारताने थेट पाकिस्तानच्या छाताडावर वार केला. — सैन्याला दिली मोकळीक – दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचे आदेश पंतप्रधान मोदी म्हणाले,…

Read More

इंग्लंड दौऱ्याआधी विराट कोहलीचा मोठा निर्णय, टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; भावनिक पोस्ट शेअर करत दिला निरोप

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सोमवारी सोशल मीडियावरून टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने शेअर केलेल्या पोस्टमधून आपल्या 14 वर्षांच्या टेस्ट प्रवासावर प्रकाश टाकला. मागील वर्षी T20 विश्वचषकानंतर कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, तो वनडे फॉरमॅटमध्ये खेळत राहणार आहे. 14 वर्षांच्या शानदार टेस्ट प्रवासावर पडदा विराट कोहलीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया…

Read More

ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले पाक लष्कराचे पाच अधिकारी; भारतीय लष्कराकडून मोठा खुलासा.

नवी दिल्ली | डिजिटल डेस्क: पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पंधरव्या दिवशी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या मोहिमेत भारताने अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत काही प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा केला. विशेष बाब म्हणजे, ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तान लष्कराचे वरिष्ठ अधिकारी हजर होते, अशी माहिती भारतीय लष्कराने पुराव्यांसह उघड केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने दहशतवादी अड्ड्यांवर तडाखा…

Read More

“मोदीजी, लढाई थांबवू नका!” युद्धविरामावर संतप्त प्रतिक्रिया, छत्तरपूरकरांचे मोदींना थेट आवाहन.

भारत-पाक संघर्ष: मध्यप्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथे आलेल्या भक्तांनी भारत-पाकिस्तान युद्धविरामाला अर्धवट पाऊल असे म्हटले आहे. त्यांचे मत आहे की, दहशतवाद मुळासकट नष्ट होईपर्यंत युद्ध सुरू राहिले पाहिजे. छत्तरपूरमधील नागरिकांचे युद्धविरामावर नाराजीचे सूर भक्तांची मागणी – दहशतवाद नष्ट होईपर्यंत लढाई सुरू ठेवा बागेश्वर बालाजींच्या चरणी सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम जाहीर झाला…

Read More

आम्ही घरात घुसून मारलं…’ भारतीय सैन्य दलाचा ‘ऑपरेशन सिंदूर’चा अचूक प्रहार; संरक्षणमंत्र्यांनी उघड केली मिशनमागील गोष्ट राजनाथ सिंह यांचे मोठे विधान : ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू, HQ-9 मिसाईल सिस्टम उद्ध्वस्त

नवी दिल्ली – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, भारतीय लष्कराचे ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू आहे. त्यांनी स्पष्ट केले की पाकिस्तानच्या हवाई संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या HQ-9 मिसाईल यंत्रणांचा पूर्णपणे नाश करण्यात आला आहे. त्यांनी भारतीय सैन्याने दाखवलेली शौर्य आणि कर्तबगारी ही अकल्पनीय असून, लष्कराचे मनापासून अभिनंदन केले. रक्षा मंत्र्यांकडून लष्कराच्या पराक्रमाला सलाम राजनाथ…

Read More

बहावलपूर-मुरीदकेतील दहशतवादी तळ नेस्तनाबूत.

नवी दिल्ली (डिजिटल डेस्क) – भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा करारा प्रतिशोध घेतला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानातील बहावलपूर आणि मुरीदके येथील दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले करून त्यांना मोठे नुकसान पोहोचवले. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांचे मुख्यालय पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. भारताचा हुशार आणि मोजका प्रहार, दहशतवाद्यांना जबर धक्का जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूरमधील मुख्यालय 2015…

Read More