श्रीरामपूर(प्रतिनिधी) :- भारतीय जवानांना आर्थिक मदत करण्याइतपत कोणीही मोठे नाही.पहलगाम मधील भ्याड हल्ल्यातील हिंदूंच्या हत्येचा भारताने पाकिस्तानवर हल्ला करून बदला घेतला आज लढाई थांबवण्यात आली आहे नाहीतर राष्ट्रीय श्रीराम संघाच्या माध्यमातून राज्यभर पावती पुस्तकांवर भारतीय सैनिकांसाठी शस्त्रे घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात निधी गोळा केला असता असे बिनधास्त आणि परखड प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे नेते व राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी शहरातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शाहिद जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅली प्रसंगी बोलतांना व्यक्त केले आहे.*
हिंदू धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्ताने मोठ्या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय श्रीराम संघ व शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नियोजित करण्यात आलेले होते परंतु पहलगाम हल्ल्यात हिंदूंना धर्म विचारून मारण्यात आल्याचा निषेध म्हणून नियोजीत कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगून सागर बेग म्हणाले की,पहलगाम हल्ल्याचा राग प्रत्येक हिंदू भारतीयांच्या मनात भरलेला आहे.दिल्लीतील सक्षम नेतृत्व लाभलेल्या मोदींनी त्या भ्याड हल्ल्याचा बदला “ऑपरेशन सिंदूर” ने पाकिस्तानमध्ये घुसून घेतल्याने प्रत्येक भारतीयांची मान अभिमानाने उंचावलेली आहे.ऑपरेशन सिन्दुर कारवाईत काही भारतीय जवानांना वीरमरण प्राप्त झालेले आहे.त्यामध्ये दोन जवान हे महाराष्ट्रातील आहेत त्या जवानांच्या कुटुंबाला हिंदू धर्मियांकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून हिंदू धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अवघ्या दोनच दिवसांत तब्बल नव्वद हजारांची मदत आज तहसीलदार यांच्याकडे सोपवण्यात आली.असा जमा केलेला निधी फक्त आणि फक्त हिंदू धर्मियांकडूनच गोळा करून वीरमरण प्राप्त जवानांच्या कुटुंबाला मदत स्वरूपात पहिल्यांदा श्रीरामपूर शहरातून गोळा झाल्याचे व असा कार्यक्रम घेतल्याचे याप्रसंगी बेग यांनी आवर्जून सांगितले.
राष्ट्रीय श्रीराम संघाकडून पन्नास हजार तर हिंदू धर्मियांकडून चाळीस हजार रुपये जमा झाले अवघ्या दोनच दिवसांच्या नियोजनात लाखाच्या आसपास रक्कम जमा झाली हेच नियोजन दहादिवस अगोदर केले असते असते उच्चांकी निधी जमा झाला असल्याचे सागर बेग यांनी आपल्या भाषणातून सांगितले.सिद्धिविनायक मंदिरापासून सुरुवात झालेली तिरंगा रॅली मेनरोड ने जाऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पालिकेतील महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार घालून सिद्धिविनायक चौकात त्याचे रूपांतर भव्य सभेत झाले.दिडशे फूट लांब तिरंगा झेंडा घेऊन निघालेल्या रॅलीचे शहरातून पावलोपावली भव्य स्वागत करण्यात आले.भारतीय सैन्यात कर्तव्य बजावून आलेल्या मेजर विशाल जाधव यांचा सत्कार याप्रसंगी सागर बेग यांच्या हस्ते करण्यात आला.
तहसीलदार मिलिंदकुमार वाघ हे आयुक्तांचा दौरा असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहू न शकल्याने नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर यांनी जमा झालेला निधी सागर बेग यांच्या हस्ते स्वीकारला तेंव्हा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपाचे दत्ता भाऊ खेमनर,राजेश वाव्हळ,सुनील पाचोने,भाऊसाहेब वाघमारे,समीर माळवे,आकाश बेग यांच्यासह असंख्य कार्यकर्ते प्रयत्नशील होते.