आज भारताचा 79वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून 12व्यांदा राष्ट्राला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी ऑपरेशन सिंदूरपासून आत्मनिर्भरतेपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी युवकांसाठी ‘पीएम विकसित भारत रोजगार योजना’ सुरू करण्याची घोषणा केली आणि आत्मनिर्भर बनण्याचा तसेच ‘वोकल फॉर लोकल’ या मंत्राचा स्वीकार करण्याचा सल्ला दिला.
—
युवकांना आत्मनिर्भरतेचा संदेश
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे असेल तर आपल्याला सर्वोत्तम व्हावे लागेल. हीच काळाची गरज आहे. मी वारंवार आग्रह करतो की हा कोणत्याही राजकीय पक्षाचा अजेंडा नाही, तर देशाचा विकासाचा मंत्र आहे. भारत आपला सर्वांचा आहे आणि आपण मिळून ‘वोकल फॉर लोकल’ साकार करायला हवे.”
ते पुढे म्हणाले, “येणारा काळ ईव्ही (EV) चा आहे. आपला मंत्र असावा – किंमत कमी, दम जास्त. उत्पादन खर्च देखील कमी करणे आवश्यक आहे.”
—
‘दुसऱ्याची रेषा लहान न करता, स्वतःची रेषा मोठी करा’
मोदी यांनी नागरिकांना आवाहन केले की, “आपण कोणाच्याही रेषा लहान करण्यासाठी ऊर्जा खर्च करू नये, तर स्वतःची रेषा मोठी करण्यावर भर द्यावा. जर आपण आपली रेषा मोठी केली, तर जग देखील आपली दखल घेईल. जागतिक स्पर्धा आणि आर्थिक स्वार्थ वाढत असताना संकटांवर रडून न बसता धैर्याने पुढे जाण्याची गरज आहे.”
—
‘स्वार्थाच्या चंगुलात अडकणार नाही’
पंतप्रधान म्हणाले, “जर आपण हा मार्ग निवडला, तर कुठलाही स्वार्थ आपल्याला आपल्या चंगुलात अडकवू शकणार नाही. गेलेले दशक रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म यांचे होते, पण आता आपल्याला आणखी नव्या ताकदी
ने कामाला लागावे लागेल.”
