भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव कायम; दुसऱ्या दिवशीही दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती
पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये ड्रोन व क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केले. मात्र भारताच्या अत्याधुनिक S-400 क्षेपणास्त्र प्रणालीने हे सर्व हल्ले हवेतच निष्फळ ठरवले. भारताने प्रत्युत्तरादाखल लाहोर, कराची आणि रावळपिंडीतील HQ-9 एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केले. दोन पाकिस्तानी फायटर जेट – F-16 आणि JF-17 – हवेतच पाडण्यात आले.
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला जम्मूकडे रवाना
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा ताफा उधमपूरमार्गे जम्मूकडे निघालाय. सीमारेषेवरील स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी ते जात आहेत.
—
मुंबईत आकाशात संशयित ड्रोनची हालचाल, पोलीस तपासात
मुंबईच्या साकिनाका परिसरात सकाळी ५ वाजता एक अनोळखी ड्रोन आकाशात दिसले. यानंतर पोलीस तात्काळ सक्रिय झाले. अद्याप ड्रोनबाबत खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. पोलिसांना शंका आहे की हा ड्रोन स्थानिक व्यक्तीचाच असू शकतो जो नियमभंग करत वर उडवत होता.
—
दिल्लीतील साउथ ब्लॉकमध्ये संरक्षण बैठकीला सुरुवात
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली साउथ ब्लॉकमध्ये उच्चस्तरीय सुरक्षा बैठक पार पडत आहे. CDS आणि तिन्ही सैन्यदलप्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत.
—
पाकिस्तानने पुन्हा केली सीमारेषेची उल्लंघन; अखनूरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न
जम्मू-काश्मीरच्या अखनूर भागात पाकिस्तानने रात्री ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. स्थानिक रहिवासी दीपक सिंह म्हणाले, “पाकिस्तानने याआधीही अनेकदा गोळीबार केला आहे, पण आजच्या हल्ल्याने सर्व सीमारेषा पार केल्या.”
—
पाकिस्तानची दुहेरी भूमिका: आधी भीक मागितली, मग म्हणाले ‘अकाउंट हॅक झाला’
भारताकडून प्रतिहल्ला झाल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक मदतीची याचना केली. त्यांनी सांगितले की “भारताने प्रचंड नुकसान केले आहे, आम्हाला कर्जाची गरज आहे.” मात्र नंतर त्यांनी सांगितले की त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले होते.
—
चंदीगढमध्ये हल्ल्याचा इशारा; नागरिकांना घरात राहण्याचे निर्देश
चंदीगढमध्ये एअर फोर्स स्टेशनने सायरन वाजवून हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांना घरातच राहण्याचा इशारा दिला गेला असून बाल्कनीत किंवा घराबाहेर उभे राहू नये, अशी सूचना करण्यात आली आहे.
—
फुटबॉल सामन्यावर तणावाचा परिणाम; सामना रद्द
राजस्थान सरकारने तातडीने महिला फुटबॉल संघाला परत बोलावल्याने, राजस्थान आणि बिहार महिला संघातील सामना रद्द करण्यात आला. हा सामना “खेळो इंडिया” अंतर्गत रिफायनरी स्टेडियममध्ये होणार होता.
—
पटणा विमानतळावर हाय अलर्ट; काही उड्डाणे रद्द
भारत-पाकिस्तान संघर्ष वाढत असताना, पटणा विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. १० मेपर्यंत काही मार्गांवरील फ्लाईट्स – उदा. भुवनेश्वर, चंदीगढ – रद्द करण्यात आल्या आहेत.
—
पाकिस्तानने उरीतील लागमा गावावर शेलिंग केलं; तीन दुकाने जळून खाक
काश्मीरच्या उरी परिसरात पाकिस्तानने रात्री १२ ते १ दरम्यान शेलिंग केलं, ज्यात तीन दुकाने पूर्णतः जळून खाक झाली.
—
जम्मू एअरबेसवरील ब्लास्टची बातमी खोटी ठरली
जम्मू एअरबेसवरील ब्लास्टच्या व्हायरल बातम्या खोट्या असल्याचं PIB फॅक्ट चेकने स्पष्ट केलं आहे. व्हायरल फोटो प्रत्यक्षात २०२१ मधील काबूल एअरपोर्टवरील हल्ल्याचे आहेत.
—
राजस्थानातील सीमावर्ती गावांचे रहिवासी म्हणतात – घाबरण्याचं कारण नाही
स्थानीयांनी सांगितले, “भारताने पाकिस्तानचे सगळे हल्ले हवेतच निष्फळ ठरवले”. त्यांनी ब्लॅकआउटच्या सर्व सूचनांचे पालन केले.
—
शेलिंगमध्ये अनेक दुकाने उद्ध्वस्त
काश्मीरमध्ये शेलिंग दरम्यान स्थानिक दुकाने आणि घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. काही व्यापाऱ्यांनी सांगितले की “काल रात्री दुकान बंद केल्यावर लगेचच शेलिंग सुरु झाले”.
—
बगलिहार व सलाल धरणाचे दरवाजे उघडले
चिनाब नदीवरील बगलिहार आणि सलाल धरणांचे दरवाजे उघडण्यात आले. धरणांतील पाण्याचा एक भाग सोडण्यात आला आहे.
—
उरी व बारामुल्ला परिसरातील स्थिती नियंत्रणात
काश्मीरमधील उरी आणि बारामुल्ला परिसर पुन्हा सामान्य स्थितीकडे जात आहे. रात्री येथे पाकिस्तानने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता.
—
नौशेरा येथे २ पाकिस्तानी ड्रोन भारतीय सेनेने पाडले
भारतीय लष्कराने जम्मूच्या नौशेरा परिसरात दोन पाकिस्तानी ड्रोन पाडले आहेत. दोन्हीकडून जोरदार आर्टिलरी फायरिंगही झाली.
—
श्रीनगर शहरात सन्नाटा; शाळा, कॉलेज बंद
सीमेवरील हल्ल्यांनंतर श्रीनगरमध्ये शाळा, कॉलेज व विद्यापीठे बंद ठेवण्यात आली आहेत. शहरात सन्नाटा आणि भीतीचे वातावरण आहे.
—
राजौरीमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क
राजौरी जिल्ह्यात पोलीस प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत आहेत. प्रवाशांची तपासणी सुरु असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
—
भारतीय लष्कराची माहिती – पाकिस्तानकडून युद्धजन्य कारवाया सुरु
भारतीय लष्कराने सांगितले की ८-९ मेच्या रात्री पाकिस्तानने पश्चिम सीमेवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले केले. मात्र भारताने सर्व हल्ले निष्फळ केले असून जोरदार प्रत्युत्तर सुरु आहे.