बलुचिस्तानचा भारताला पाठिंबा; संयुक्त राष्ट्रांना हस्तक्षेपाची मागणी
मीर यार बलोच यांनी स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानसारख्या दहशतवादी देशाच्या अत्याचारांपासून मुक्त होण्यासाठी बलुच जनतेला स्वातंत्र्य हवे आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाकडे विनंती केली आहे की, ते त्वरित शांतता मोहिम पाठवून बलुचिस्तानमध्ये स्थैर्य निर्माण करावे. तसेच, भारताने दिल्लीमध्ये बलुचिस्तानसाठी दूतावास उघडावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बलुचिस्तानमधून पाकिस्तान समर्थक कर्मचाऱ्यांना हाकलण्याचा इशारा
बलोच नेत्यांनी इशारा दिला आहे की, जे कोणी पाकिस्तानच्या मदतीसाठी बलुचिस्तानमध्ये आहेत, त्यांनी त्वरित प्रदेश सोडावा अन्यथा कारवाई केली जाईल. हे स्पष्ट करत त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणाचा पर्दाफाश केला आहे