भारत-पाक संघर्ष: मध्यप्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथे आलेल्या भक्तांनी भारत-पाकिस्तान युद्धविरामाला अर्धवट पाऊल असे म्हटले आहे. त्यांचे मत आहे की, दहशतवाद मुळासकट नष्ट होईपर्यंत युद्ध सुरू राहिले पाहिजे.
छत्तरपूरमधील नागरिकांचे युद्धविरामावर नाराजीचे सूर
भक्तांची मागणी – दहशतवाद नष्ट होईपर्यंत लढाई सुरू ठेवा
बागेश्वर बालाजींच्या चरणी सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम जाहीर झाला असला तरी भारतीय नागरिकांमध्ये युद्धाबाबत अजूनही मोठा उत्साह आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामुळे युवकांमध्ये देशासाठी लढण्याची तयारी निर्माण झाली आहे. काही युवकांनी तर विना-वर्दी सीमेवर लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, युद्ध थांबवणं हे चुकीचं आहे. पाकिस्तानला गारद करण्यासाठी युद्ध चालूच ठेवायला हवे होते.
न्यूज 18 चे प्रतिनिधी पिंटू अवस्थी यांनी बागेश्वर धामातील भक्तांशी भारत-पाक युद्धविरामाबाबत संवाद साधला. युद्ध थांबवणं चुकीचं असल्याचं अनेक भक्तांचं स्पष्ट मत होतं.
ललितपूरहून बागेश्वर धाम येथे आलेले भक्त जय नारायण गोस्वामी म्हणाले, “हे युद्धविराम अजिबात योग्य नाही. हे युद्ध पुढे चालू ठेवायला हवं होतं. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना प्रार्थना करतो की, दहशतवाद पूर्णपणे नष्ट होईपर्यंत हे युद्ध थांबवू नये. अधुरी लढाई थांबवली, तर पाकिस्तानमधील दहशतवाद पुन्हा डोकं वर काढेल आणि भारतासाठी धोका ठरेल. पुन्हा-पुन्हा लढण्यापेक्षा एकदाच निर्णायक लढाई करून विषय संपवावा.”