Home » एअर इंडिया विमान अपघात: “मी उडी मारली नव्हती…” – जीवंत बचावलेले विश्वास कुमार यांनी पंतप्रधान मोदींना काय सांगितले?

एअर इंडिया विमान अपघात: “मी उडी मारली नव्हती…” – जीवंत बचावलेले विश्वास कुमार यांनी पंतप्रधान मोदींना काय सांगितले?

नवी दिल्ली | एअर इंडिया विमान दुर्घटना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सिव्हिल रुग्णालयात एअर इंडिया विमान अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची भेट घेतली. त्यांनी या दुर्घटनेतील एकमेव जीवित राहिलेल्या प्रवाशाशी – विश्वास कुमार रमेश – यांच्याशीही संवाद साधला. विश्वास यांनी सांगितले की, “मी उडी मारली नव्हती, तर माझ्या सीटसह बाहेर फेकला गेलो होतो.”

ही अत्यंत दुर्दैवी घटना असून लंडनला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये एकूण 242 प्रवासी होते, त्यापैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. विमानाने दुपारी 1.38 वाजता उड्डाण घेतले आणि काही सेकंदांतच बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर आदळले.

अपघातानंतर काही तासांत सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, ज्यामध्ये रक्ताने माखलेले विश्वास कुमार रुग्णवाहिकेकडे जात असल्याचे दिसून आले.

भावासोबत यूकेला परतत होते विश्वास

विश्वास कुमार रमेश हे 40 वर्षीय ब्रिटनमधील नागरिक असून भारतात आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी आले होते. अपघाताच्या दिवशी ते आपल्या भावासोबत – अजय कुमार रमेश (वय 45) – यूकेकडे परतत होते. विश्वास 11A या सीटवर बसले होते, तर त्यांचे बंधू वेगळ्या रांगेत होते.

अपघाताबाबत विश्वास यांनी काय सांगितले?

त्यांनी सांगितले, “विमानाने उड्डाण घेतल्यानंतर जवळपास ३० सेकंदांत जोरदार आवाज आला आणि ताबडतोब विमान कोसळले. हे सगळं इतकं जलद घडलं की काही समजायच्या आत मी भानावर आलो तेव्हा माझ्या आजूबाजूला मृतदेह विखुरलेले दिसले. मी घाबरलो, उभा राहिलो आणि धावत सुटलो. विमानाचे तुकडे सगळीकडे पडले होते. कोणीतरी मला धरले आणि रुग्णवाहिकेत टाकून रुग्णालयात दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *