भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे अलर्टवर; ब्लॅकआउट आणि आणीबाणीमुळे गाड्या रद्द व विलंबित, यादी पाहा
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशातील रेल्वे प्रशासन सतर्क झाले आहे. सुरक्षा उपाययोजनांअंतर्गत रेल्वे विभागाने कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिल्या असून, काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था भारतीय लष्करी हालचालींबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना सावध राहण्याचे…