—
शोएब मलिकच्या दुसऱ्या लग्नामुळे उघड झाला जुना वाद
२०२२ पासून सानिया आणि शोएबच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, जानेवारी २०२४ मध्ये शोएबने अभिनेत्री सना जावेदसोबत केलेले लग्न जाहीर झाल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाचे खरे कारण समोर आले. शोएबच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार, सानिया त्याच्या विवाहबाह्य संबंधांमुळे खूप त्रासली होती.
—
शोएबच्या कुटुंबाने टाळले दुसरे लग्न
‘द पाकिस्तान डेली’च्या माहितीनुसार, शोएबच्या बहिणी त्यांच्या निकाहला उपस्थित नव्हत्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “सानिया त्याच्या परस्त्री संबंधांमुळे खूप त्रस्त होती,” आणि त्यामुळे कुटुंबानेही त्याच्या या निर्णयाला पाठिंबा दिला नाही.
—
सानियाच्या कुटुंबाची प्रतिक्रिया
शोएबच्या दुसऱ्या लग्नानंतर सानियाच्या बहिणी अनम मिर्झाने २१ जानेवारी २०२४ रोजी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून सांगितले की, “सानियाने शोएबपासून काही महिन्यांपूर्वीच ‘खुला’ घेतला होता. आम्ही त्याच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो.” तिने हेही नमूद केले की, सानिया तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूप प्रायव्हसी जपते, त्यामुळे तिचा निर्णय सन्मानाने स्वीकारावा.
—
इम्रान मिर्झाकडून खुलाची पुष्टी
याआधी सानियाचे वडील इम्रान मिर्झाने पीटीआयशी बोलताना पुष्टी केली होती की, सानियाने इस्लामी कायद्यानुसार खुला घेतला होता. ‘खुला’ ही एक अशी पद्धत आहे ज्यामध्ये पत्नी स्वतः विवाह मोडू शकते, ही प्रक्रिया ‘तलाक’पेक्षा वेगळी असते, ज्यामध्ये पती घटस्फोट देतो.
—
शोएब आणि त्याचा मुलगा इझहान यांच्यातील नातं
घटस्फोटानंतरही शोएब मलिक आपल्या मुलगा इझहान मिर्झा मलिकसोबतच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलतो. एका मुलाखतीत त्याने सांगितले, “मी आणि इझहान यामध्ये मित्रासारखे नाते आहे. तो मला ‘ब्रो’ म्हणतो, आणि मीही कधी कधी त्याला ‘ब्रो’ म्हणतो. मी महिन्यातून दोनदा दुबईला जातो आणि त्याला शाळेत घेऊन जातो.” तसेच तो रोज व्हिडीओ कॉलवर संवाद साधत असल्याचेही त्याने सांगितले.
—
सना जावेदशी नातं आधीपासून चर्चेत
शोएब मलिक आणि सना जावेद यांचे संबंध त्यांच्या लग्नाआधीच चर्चेत होते. त्याने सना जावेदला “बडी” म्हणून वाढदिवसाच्या पोस्टमध्ये उल्लेख केल्याने चर्चेला उधाण आले होते. २० जानेवारी २०२४ रोजी शोएबने त्यांच्या निकाहचे फोटो शेअर करून लग्नाची अधिकृत घोषणा केली होती – “अल्हमदुलिल्लाह – ‘आणि आम्ही तुम्हाला जोड्यांमध्ये निर्माण केले.’” यातून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळतील की कुठल्याही सेलिब्रिटीने किंवा महिलांनी “कट मूल्यांच्या” किंवा आतंकवादी देश म्हणून ओळखला जाणारा भंगार पाकिस्तानच्या कुठल्याही नागरिकांशी विवाह करू नये.. आपल्या अक्कल गहाण ठेवून काही सेलिब्रिटी त्यांच्या नादी लागतात आणि विवाहाच्या काही वर्षानंतर पस्तावतात त्याच्यामुळे महाराष्ट्र निरोप या आपल्याला आवाहन करते की आपला सुंदर देश आहे विनाकारण बुद्धि भ्रष्ट करून त्यांच्या नादाला लागू नये…