भारत-पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असून भारताने पाकिस्तानवर निर्णायक कृती सुरू केली आहे. जम्मू-कश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले आणि गोळीबाराचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी सकाळी पाकिस्तानातील अनेक हवाईतळांवर प्रचंड स्फोट झाले असून, त्यात इस्लामाबादच्या जवळील एक महत्त्वाचे लष्करी केंद्र देखील लक्ष्य करण्यात आले आहे.
भारतीय सैन्याकडून पाकिस्तानवर निर्णायक कृती; इस्लामाबादजवळ क्षेपणास्त्रांचा मारा
डिजिटल डेस्क, नवी दिल्ली – भारत-पाकिस्तान दरम्यानचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. भारताने पाकिस्तानवर जोरदार कारवाई करत त्यांच्या तीन हवाईदल तळांना लक्ष्य केले. सीमावर्ती भागांमध्ये ड्रोन हल्ले आणि गोळीबाराच्या घटनांनंतर शनिवारी पहाटे पाकिस्तानच्या विविध भागांतील हवाईतळांवर जोरदार स्फोट झाल्याचे समजते.
भारताकडून तीन पाक हवाईदल तळांवर निशाणा
या स्फोटांनंतर पाकिस्तान सरकारने देशातील संपूर्ण हवाई क्षेत्र नागरी आणि व्यावसायिक विमान वाहतुकीसाठी तात्काळ बंद केले आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या माहितीनुसार हे स्फोट तीन लष्करी हवाईतळांवर झाले असून, त्यामध्ये रावळपिंडी येथील नूर खान एअर बेसचा समावेश आहे. हा हवाईतळ इस्लामाबादपासून अवघ्या १० किमी अंतरावर असून देशाच्या मुख्य लष्करी मुख्यालयालगत आहे.
नूर खान एअर बेसवर स्फोट; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
पाकिस्तानी माध्यमांनुसार, नूर खान हवाईतळावर मोठा स्फोट झाल्यानंतर तेथे आगीचे मोठे लोळ उठताना काही व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र ‘महाराष्ट्र निरोप’ या दैनिकाकडून या व्हिडिओंना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे की, रात्रीभर भारताकडून सातत्याने स्फोट घडवून आणले गेले