नवी दिल्ली – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, भारतीय लष्कराचे ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू आहे. त्यांनी स्पष्ट केले की पाकिस्तानच्या हवाई संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या HQ-9 मिसाईल यंत्रणांचा पूर्णपणे नाश करण्यात आला आहे. त्यांनी भारतीय सैन्याने दाखवलेली शौर्य आणि कर्तबगारी ही अकल्पनीय असून, लष्कराचे मनापासून अभिनंदन केले.
रक्षा मंत्र्यांकडून लष्कराच्या पराक्रमाला सलाम
राजनाथ सिंह म्हणाले, “भारतीय लष्कराने शौर्याचे उदाहरण सादर केले असून पीओकेमधील दहशतवादी छावण्या उद्ध्वस्त केल्या आहेत. यासाठी भारतीय लष्कराचे मी हृदयपूर्वक अभिनंदन करतो.” दिल्लीतील DRDO भवनात झालेल्या ‘नॅशनल क्वालिटी कॉन्क्लेव 2025’मध्ये ते बोलत होते.
‘ऑपरेशन सिंदूर’बाबत राजनाथ सिंह यांनी काय सांगितले?
“भारतीय लष्कराच्या धाडसाला सलाम. पीओके आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले आहेत.”
“ही कारवाई इतकी अचूक आणि परिणामकारक होती की यात कोणताही निरपराध व्यक्ती जखमी झाला नाही. आपली सशस्त्र सेना ही पूर्णतः व्यावसायिक असून त्यांच्या हातातील उपकरणे उच्च दर्जाची आहेत.”
“काल जसे आपण पाहिले, तसेच पुढेही जर कोणी सहनशक्तीचा गैरफायदा घेतला तर पुन्हा तसाच प्रहार होईल.”
“पाकिस्तान आणि पीओकेमध्ये आपल्या सुरक्षा दलांनी जो पराक्रम दाखवला, तो देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
“ऑपरेशन सिंदूर हे एका नव्या कार्यक्षमतेचे आणि अचूकतेचे प्रतीक ठरले आहे.”
22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताची धडक कारवाई
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने 7 मे रोजी घेतला. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये एकूण 9 दहशतवादी तळांचा नाश केला.