Home » पाकिस्तानचे (पाकड्याचे )दुष्ट हेतू उधळून लावले – पंतप्रधान मोदी यांचे आदमपूरहून भाषण

पाकिस्तानचे (पाकड्याचे )दुष्ट हेतू उधळून लावले – पंतप्रधान मोदी यांचे आदमपूरहून भाषण

ऑपरेशन सिंदूरनंतर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जालंधर येथील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. त्यांनी तेथून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, “गर्वाने सांगतो की आपण सर्वांनी आपले उद्दिष्ट पूर्णतेने साध्य केले आहे. पाकिस्तानचे दहशतवादी तळ आणि हवाई तळच नाही, तर त्यांचे दुष्ट हेतू आणि दुस्साहस देखील पराभूत झाले आहेत.”

आदमपूर एअरबेसहून मोदींचे राष्ट्राला उद्दबोधन

पंतप्रधान मोदी यांनी जवानांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत फोटोही काढले. हा फोटो केवळ आठवणींसाठी नव्हता, तर पाकिस्तानच्या खोटेपणाला जगासमोर उघड करणारा पुरावा होता. या फोटोमध्ये त्यांच्या मागे मिग-29 लढाऊ विमान आणि S-400 एअर डिफेन्स सिस्टिम स्पष्ट दिसत होते, ज्यामुळे पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांना उत्तर मिळाले.

मोदींचे भाषणाचे ठळक मुद्दे:

“आपण देशाच्या सीमांचे संरक्षण केले. केवळ २५ मिनिटांत सीमापार असलेल्या दहशतवाद्यांना पळवून लावले.”

“आपल्या ड्रोनने शत्रूच्या बुरुजांना कोसळवले, आपल्या क्षेपणास्त्रांनी धडधडाट करत लक्ष्य गाठले आणि शत्रूला ‘भारत माता की जय’चा जयघोष ऐकू आला.”

“रात्र असो वा दिवस, भारताच्या शक्तीचा प्रकाश नेहमी प्रखर असतो.”

“आपण केवळ पाकिस्तानचे हवाई तळ उद्ध्वस्त केले नाहीत, तर त्यांचे आण्विक ब्लॅकमेलही निष्फळ ठरवले.”

“आपण इतिहास घडवला आहे, प्रत्येक भारतीयाची आई आज अभिमानाने भरून आली आहे.”

ऑपरेशन सिंदूरचा दणका

पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरमुळे गोंधळून जाऊन अनेक वेळा आदमपूर आणि इतर एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रत्येकवेळी त्यांच्या योजना फसल्या.

फोटोचा संदेश

पंतप्रधान मोदी यांचा जवानांबरोबरचा फोटो आणि त्यामागचा मिग-29 आणि S-400 प्रणाली, पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांना खुलासा करणारे आहेत. पाकिस्तानने दावा केला होता की त्यांनी आदमपूर एअरबेस आणि S-400 प्रणाली उद्ध्वस्त केली आहे, पण प्रत्यक्षात ती पूर्णपणे सुरक्षित आहे.

आज दुपारी ३:३० वाजता पंतप्रधान मोदींचे आदमपूर एअरबेसवरील भाषण अधिकृतपणे प्रसारित होणार आहे.