Headlines

पिंपळगाव माळवी च्या ग्रामस्थांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. माजी उपसरपंच लताबाई कराळे हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी.

नगर (प्रतिनिधी)- मौजे पिंपळगाव माळवी येथील माजी उपसरपंच लताबाई नानाभाऊ कराळे यांची निर्गुण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शिव प्रहार संघटनेच्या वतीने व पिंपळगाव माळवी च्या ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले यावेळी शिव प्रहार संघटनेचे युवक तालुकाप्रमुख गोरक्षनाथ आढाव समवेत पिंपळगाव माळवी ग्रामस्थ आशा आढाव, वैशाली आढाव, मनीषा…

Read More

पहलगाम हल्ला : मोदी-पुतिन यांची चर्चा, दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकांमुळे पाकिस्तानची धडधड वाढली

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखीनच वाढलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेमागे असलेल्या व्यक्तींना आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. भारताने घेतलेल्या हालचालींमुळे पाकिस्तानमध्ये चिंता आणि गोंधळाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली….

Read More

जिल्ह्यातील ५३८ पाणंद, शिव रस्ते वापरास खुले-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी अतिक्रमित व बंद झालेले पाणंद, शिव रस्ते खुले करुन घेण्याकरीता ३१ मे पर्यंत अर्ज करावे- जिल्हाधिकारी

पुणे, दि. ५: जिल्ह्यात अतिक्रमित व बंद असलेले पाणंद, शिव रस्ते वापरास खुले करण्यासाठी जानेवारी २०२५ पासून मोहीम हाती घेण्यात असून माहे एप्रिल २०२५ अखेर एकूण ७०४ कि.मी. लांबीचे ५३८ रस्ते वापरास खुले करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. जिल्ह्यातील गाव नकाशेप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले पाणंद, शिव रस्ते खुले…

Read More

शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकाससारख्या क्षेत्रांसाठी कृत्रीम बुद्धीमत्तेचे स्वतंत्र कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत — उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

‘मायक्रोसॉफ्ट’सारख्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या कृत्रीम बुद्धीमत्ता कौशल्यवृद्धी सहकार्यात उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका बजावावी — उपमुख्यमंत्री अजित पवार शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य क्षेत्रांमध्ये कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचाचा वापर वाढवणे काळाची गरज — उपमुख्यमंत्री अजित पवार कृत्रीम बुद्धीमत्ता क्षेत्रात कौशल्यवृद्धीसाठी मदत करणाऱ्या मायक्रोसॉफ्टसह सर्वांचे स्वागत, सर्वांनासहकार्याची भूमिका — उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. 5…

Read More

राजूर येथील कावीळ साथ रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, दि. ४ : राजूर येथे कावीळचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. डॉक्टरांची टीम पूर्णवेळ तैनात राहणार असून, रक्त तपासणीचे अहवाल लवकर मिळावेत यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. राजूरमध्ये कावीळग्रस्त रुग्णांची संख्या…

Read More

राज्य शासन आणि ग्लोबल मीडिया क्षेत्रातील भागीदारांमध्ये व्हेवज संमेलनाच्या माध्यमातून नवे पर्व नेटफ्लिक्स, मोशन पिक्चर आणि युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपच्या प्रमुखांबरोबर मुख्यमंत्र्यांची चर्चा

मुंबई, दि. ४ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारंडोस, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे इंडिया व साउथ एशियाचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी देवराज सान्याल आणि मोशन पिक्चर असोसिएशनचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिवकिन या दिग्गजांची भेट घेऊन माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील कौशल्य विकासासंदर्भात तसेच चर्चा केली. राज्य शासन…

Read More

HSC निकाल 2025 : राज्याचा एकूण निकाल 91.88%, बारावीचा निकाल घोषित

महाराष्ट्र बोर्डाने आज बारावीचा निकाल जाहीर केला असून राज्याचा यंदाचा निकाल 91.88% इतका लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल mahresult.nic.in, results.digilocker.gov.in, mahahsscboard.in आणि https://hscresult.mkcl.org/ या संकेतस्थळांवर पाहता येईल. निकाल 2025 : वडिलांची आठवण, वैभवी देशमुखने भावुक शब्दांत मांडली भावना बीड – “माझ्या मेहनतीचे चीज झाले, पण वडिलांच्या शुभेच्छांची उणीव आहे.” 85.33% गुण मिळवलेल्या वैभवी देशमुखने आपले…

Read More

राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री जन नाकातानी यांची आज दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा; दहशतवाद, सामरिक सहकार्य आणि इंडो-पॅसिफिक सुरक्षेवर होणार विचारविनिमय

नवी दिल्ली – भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री जन नाकातानी यांची आज नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या चर्चेत पहलगाम हल्ल्यानंतरची परिस्थिती, संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य, चीनची वाढती उपस्थिती आणि इंडो-पॅसिफिक भागातील सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दोन्ही देश दहशतवादाविरोधात संयुक्त धोरण, तसेच सैनिकी तळांचा वापर यावरही चर्चा करतील….

Read More

पंचायत’चा चौथा सीझन लवकरच; गावकथांच्या विश्वाची कल्पना, निर्माते दीपक मिश्रा यांची उघड भूमिका

पंचायत’ सीझन ४ चा टीझर प्रदर्शित; ग्रामीण जीवनावर आधारित कथानक पुन्हा सज्ज ‘पंचायत’ या गाजलेल्या ग्रामीण वेब सिरीजच्या चौथ्या पर्वाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, ही मालिका लवकरच ॲमेझॉन प्राइमवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे. मिश्रा यांनी एका कार्यक्रमात बोलताना, ‘पंचायत’सह इतर ग्रामीण विषयांवर आधारित कथा एकत्र…

Read More

पाकिस्तानला बसणार पाण्याचा मोठा फटका! सिंधू करारानंतर भारताचा आणखी कठोर निर्णय; बगलिहार धरणातून थांबवले चिनाबचे पाणी

भारताने सिंधू जल करार रद्द केल्यानंतर आता पाकिस्तानवर आणखी एक मोठा पाणलोट धोका निर्माण केला आहे. भारत सरकारने चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाण्याचा प्रवाह थांबवला आहे. त्यामुळे सिंधू प्रणालीतील पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे. याचबरोबर झेलम नदीची उपनदी नीलमवर असलेल्या किशनगंगा प्रकल्पालाही बंद करण्याची तयारी भारत करत आहे. भारताची पाण्यावर नियंत्रण धोरण: चिनाब…

Read More