Headlines

चंद्रशेखर बावनकुळे: ‘चांदवडला येऊ का?’ – फोन उचलताच मंत्री बावनकुळे संतापले, तहसीलदारांना दिली तंबी

शनिवारी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विभागीय आयुक्त कार्यालयात ‘जनसंवाद’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात एका अधिकाऱ्याविरोधात आलेल्या सततच्या तक्रारींमुळे बावनकुळे संतापले. त्यांनी थेट सभागृहातून चांदवडचे तहसीलदार यांना फोन करून विचारलं, “चांदवडला येऊ का? पहिल्या १० पैकी ८ तक्रारी तुमच्याच आहेत!” असा रोष व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांशी बोला, असा सल्लाही दिला. — नाशिक तहसीलदारांनाही फटकारलं नाशिकमधील…

Read More

छगन भुजबळ यांचा बनठिया समितीच्या अहवालावर जोरदार हल्ला OBC आरक्षणावरून सरकारच्या नेमलेल्या समितीवर टीका; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला प्राधान्य राहील – भुजबळ

महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारने 2022 मध्ये नेमलेल्या बनठिया आयोगाच्या अहवालावर जोरदार टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना परवानगी दिल्यानंतर, भुजबळ यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. एका खास मुलाखतीत, जेव्हा विचारले गेले की राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला अहवाल मागे घेणार का, तेव्हा त्यांनी…

Read More

इस्रायल-हमास युद्ध: हमास प्रमुख मोहम्मद सीनवार ठार, इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांचा दावा

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बुधवारी जाहीर केलं की, इस्रायली लष्कराने हमासचा प्रमुख नेता मोहम्मद सीनवारला ठार केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इस्रायल सीनवारच्या शोधात होतं. तो याह्या सीनवारचा लहान भाऊ होता, ज्याला आधीच IDF (इस्रायली संरक्षण दल) कडून ठार मारण्यात आलं आहे. खान यूनिसमधील हॉस्पिटलमध्ये लपला होता सीनवार १४ मे रोजी इस्रायली लष्कराने खान…

Read More

स्वतंत्र वीर सावरकर : भारताचे खरे वीरपुरुष

वीर सावरकर – या नावातच असीम तेज, अद्वितीय शौर्य आणि अखंड राष्ट्रप्रेम सामावलेले आहे. त्यांच्या संपूर्ण जीवनाचा मागोवा घेतल्यास, आपणास असंख्य प्रेरणादायी पैलू दिसून येतात. आजच्या भारताला खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे असेल, तर सावरकरांचा इतिहास आणि विचार समजून घेणे अत्यावश्यक आहे. प्रारंभ – एका क्रांतिकारकाची जडणघडण २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर या छोट्याशा…

Read More

कोविड-19: देशात पुन्हा वाढतेय कोरोनाचं संकट; केरळात सर्वाधिक रुग्ण, महाराष्ट्रात 208 नवे केस

भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. देशात सध्या 1010 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केरळमध्ये सर्वाधिक 430, तर महाराष्ट्रात 208 नवे रुग्ण आढळले आहेत. काही राज्यांमध्ये मृत्यूही झाले आहेत. NB.1.8.1 आणि LF.7 हे नवे व्हेरिएंट सध्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) निरीक्षणाखाली आहेत. पुढे जाणून घ्या कोरोना संबंधीचा ताज्या घडामोडींचा आढावा. — कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ सध्या दिल्लीमध्ये…

Read More

तेजप्रताप यादव: वादाच्या पार्श्वभूमीवर तेजप्रताप यांची पहिली प्रतिक्रिया, लालू कुटुंबात आनंदाची लहर

बिहारची राजकारणात खळबळ उडवणाऱ्या वादानंतर राजदमधून निलंबित आमदार तेजप्रताप यादव यांनी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी तेजस्वी यादव आणि राजश्री यांना पुत्रप्राप्तीबद्दल शुभेच्छा दिल्या आणि आपल्या पुतण्यावर प्रेमाचा वर्षाव केला. तेजस्वी यांनीही आपल्या मुलाचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला. — बिहारचे राजकारण: तेजप्रताप यादव यांच्या नात्यांबाबतचे खुलासे, लालू कुटुंबावर ऐश्वर्या…

Read More

प्रिती झिंटाची वीर नारिंना सलामी; ऑपरेशन सिंदूरनंतर आर्मी वाइव्स वेल्फेअर असोसिएशनला 1 कोटींचे योगदान

बॉलीवूड अभिनेत्री व पंजाब किंग्ज (IPL) संघाची सहमालक प्रिती झिंटा यांनी भारतीय लष्कराच्या साउथ वेस्टर्न कमांड अंतर्गत आर्मी वाइव्स वेल्फेअर असोसिएशन (AWWA) ला 1 कोटी रुपये मदत दिली आहे. ही मदत त्यांनी 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर केली आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी गेला होता. प्रिती झिंटाने…

Read More

मुंबईत ‘वेळेपूर्वी’च दाखल झाला मॉन्सून; 75 वर्षांतील सर्वात लवकर आगमन, कोणत्या भागात किती पावसाची नोंद?

केरळनंतर आता मॉन्सून मुंबईतही दाखल झाला आहे. राज्यात रविवारीच मॉन्सूनची एंट्री झाली होती, परंतु मुंबईत इतक्या लवकर येईल, अशी शक्यता नव्हती. भारतीय हवामान विभागानुसार (IMD) गेल्या 75 वर्षांतील हा सर्वात लवकर मॉन्सून आहे. वैज्ञानिक सुषमा नायर यांनी सांगितले की, दक्षिण-पश्चिम मॉन्सून 26 मे रोजी मुंबईत पोहोचला आहे, तर सामान्यतः तो 11 जूनच्या सुमारास येतो. मुंबईत…

Read More

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करा-उपमुख्यमंत्री

बारामती, दि.२६: बारामती व इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. आपत्तीच्या काळात नागरिकांना मदत करणे राज्य शासनाचे कर्तव्य असून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, एनडीआरएफच्या निकषानुसार बाधित नागरिकांना मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन श्री. पवार यांनी यावेळी केले. श्री. पवार यांनी सकाळी महाराष्ट्र…

Read More

बारामती तालुक्यात २२६ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद-तहसीलदार गणेश शिंदे

बारामती, दि.२५: तालुक्यातील एकूण ८ मंडळात सरासरी २२६.८७ मिलिमीटर एकूण पर्जन्यमानाची नोंद झाली असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे. बारामती मंडळात ३०० मि.मी. माळेगाव बु.१६७-मि.मी., पणदरे २०५ मि.मी., वडगाव निंबाळकर २६१ मि.मी., लोणी भापकर २७९ मि.मी., मोरगाव २३२ मि.मी., सुपा १७८ मि.मी., उंडवडी क.प.१९३ मि.मी. याप्रमाणे सरासरी २२६.८७ मि.मी….

Read More